भारतीय उपखंड आणि इतिहास इयत्ता सहावी स्वाध्याय

धडा १. भारतीय उपखंड आणि इतिहास

स्वाध्याय

खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा

( १ ) इतिहास म्हणजे काय ?

उत्तर: इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय.

( २ ) मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो ?

उत्तर: जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल, तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो .

( ३ ) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून रहावे लागते ?

उत्तर: डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून रहावे लागते .

( ४ ) भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?

उत्तर: भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती हडप्पा संस्कृती आहे.

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

( १ ) मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते ?

उत्तर: मानवी समाजजीवन आहार , वेशभूषा , घरबांधणी , व्यवसाय इत्यादी गोष्टींवर अवलंबून असतो.

( २ ) आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात ?

उत्तर: आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान , पर्जन्यमान , शेतीतून मिळणारे पीक , वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात .

( ३ ) ‘ भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात ?

उत्तर: अफगाणिस्तान , पाकिस्तान , नेपाळ , भूटान , बांगलादेश , श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया ‘ या नावाने ओळखला जातो . याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला ‘ भारतीय उपखंड ‘ असेही म्हणतात .

कारणे लिहा .

( १ ) इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते .

उत्तर: १) स्थल, काल, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे चार प्रमुख आधार स्तंभ आहेत. या चारही घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही.२) स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. ३) आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात आणि मानवी समाजजीवन सुद्धा त्यांवर अवलंबून असते. ३) भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. म्हणूनच इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट आहे.

( २ ) लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते .

उत्तर: पर्यावरणाचा हास , दुष्काळ , आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली , की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते .

प्र.४) डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा .

उत्तर:

डोंगराळ प्रदेश

१) डोंगराळ प्रदेशातील लोकांचे जीवन अधिक कष्टाचे असते.

२) डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता कमी असते.

३) डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृण धान्ये आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात.

४) डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकरीवर आणि जंगलातील पदार्थांवर अवलंबून राहावे लागते.

मैदानी प्रदेश

१) मैदानी प्रदेशातील लोकांचे जीवन इतरांच्या मानाने कमी कष्टाचे असते.

२) मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

३) मैदानी प्रदेशात सुपीक जमीनमुळे त्यांना तृणधान्य आणि भाज्या सहज उपलब्धत होतात.

४) अन्नधान्य आणि भाज्यांच्या उपलब्धतेमुळे त्यांना शिकारी व जंगलावर अवलंबून राहावे लागत नाही.

पाठ्यपुस्तकातील भारत – प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा .

( १ ) भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत ?

उत्तर: भारताच्या उत्तरेकडे हिंदकुश आणि हिमालय पर्वतरांगा आहेत.

 ( २ ) भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते ?

उत्तर: भारताच्या उत्तरेकडून येणारे खैबर आणि बोलन खिंड व्यापारी मार्ग आहेत.

( ३ ) गंगा – ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम कोठे होतो ?

उत्तर: गंगा – ब्रह्मपुत्रा या नद्यांचा संगम बांग्लादेशात होतो.

( ४ ) भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत ?

उत्तर: भारताच्या पूर्वेस अंदमान आणि निकोबार ही बेटे आहेत.

( ५ ) थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे ?

उत्तर: थरचे वाळवंट भारताच्या पश्चिम दिशेला आहे.

उपक्रम

( १ ) तुमच्या परिसरात आढळणाऱ्या जलाशयांविषयी माहिती मिळवा .

( २ ) जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील बाबी / घटक दाखवा .

१. हिमालय पर्वत

२.रेशीम मार्ग

३. अरबी प्रदेश / अरबस्तान

Leave a Comment